Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

मुंबई विमानतळावरील 490 रुपयांचं बिलं ट्विटरवर का गाजतयं, काय आहे नेमकं प्रकरणं?

Mumbai International Airport Viral News

Mumbai International Airport Viral News: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर 2 सामोसे, 1 चहा आणि पाण्याच्या बॉटलची किंमत 490 रुपये.

Mumbai International Airport Viral News: सध्या ट्विटरवर(Twitter) एक पोस्ट धुमाकूळ घालतीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) यांनी 2014 च्या निवडणुकीच्या प्रचार रणनीतीत भारतीय नागरिकांना “अच्छे दिन आनेवाले है” असं आश्वासन दिलं होतं. परंतु, 8 वर्षांचा कालवधी उलटूनही अजूनही देशात अच्छे दिन का आले नाहीयेत? असा प्रश्न ट्विटरवर व्हायरल झालेल्या एका पोस्टच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे उपस्थित करण्यात करण्यात येतोय. नक्की काय आहे हे प्रकरणं चला जाणून घेऊयात.

मुंबई विमानतळावरील 490 रुपयांचं बिलं ट्विटरवर का गाजतयं?

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर(Mumbai Chhatrapati Shivaji Maharaj International Airport, Mumbai) 2 सामोसे, 1 चहा आणि पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी 490 रुपये फराह खानला मोजावे लागले असा दावा तिने ट्विटरच्या माध्यमातून केला आहे. फराह खान(Farah Khan) ही एक पत्रकार(Journalist) असून तिने यासंदर्भातील पोस्ट ट्विटरवर टाकल्याने खळबळ उडाली आहे.

समोसा,चहा आणि पाण्याच्या 490 रुपयांच्या बिलाचा सोशल मीडियावर कल्लोळ

फराहने यासंदर्भात ट्विटरवर दोन फोटो शेअर केले आहेत. एक फोटो समोसा आणि चहाचा असून दुसऱ्या फोटोमध्ये स्टॉलवरील बिलं आहे. दोन समोसे, एक चहा आणि पाण्याची बाटली विकत घेण्यासाठी 490 रुपये द्यावे लागले, असा दावा करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, “खूप चांगले दिवस आले आहेत”. या तीन छोट्या गोष्टींसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागल्याने फराहने अप्रत्यक्षपणे मोदी सरकारला टोला लगावला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक नेटकऱ्यांनी यावर भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहेत.

काय म्हणतायत नेटकरी?

एका नेटकऱ्यानं म्हटले आहे की, “हैद्राबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर खाद्यपदार्थांचे असलेले दर परवडणारे आहेत. स्थानिक हॉटेलमध्ये 15 रुपयांना समोस्याची विक्री करुनही नफा मिळवला जातो मग विमानतळावर एवढं महाग का? तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही नऊ पट पैसे देणार आहात का? हा वेडेपणा आहे…अशा गोष्टींचं समर्थन करू नये. फक्त आंधळे भक्त असा मुर्खपणा करू शकतात. तर दुसऱ्या नेटकाऱ्याने म्हंटलं आहे की बेहन तिकीट खरीद ली तो थोडा खर्च वहा पर भी करो असं म्हणतं तिलाच टोला लगावला आहे. तर काहींनी फराहला सल्ले दिले आहेत ज्यामध्ये सांगितलं आहे की, विमानतळावरून बाहेर निघून एक रिक्षा पकड आणि बाबा कॅन्टीनला जा तिथे तुला भरपूर जेवण कमी किंमतीत मिळेल. 
फराहच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत मात्र यातून प्रत्येक विमानतळावर खाद्यपदार्थांच्या किंमतीत मोठा फरक का पाहायला मिळतो यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.