By Ankush Bobade16 Mar, 2023 20:172 mins read 46 views
Image Source : www.gadgets360.com
Maharashtra Budget 2023-24: राज्याच्या अर्थसंकल्पातील 100 रुपयांमधून गृह विभागाला फक्त 5.40 रुपये मिळत आहेत. गृह विभागाच्या या वाट्यातील पोलिसांच्या पदरी फक्त 4.11 टक्के निधी पडत आहे.
Maharashtra Budget 2023-24: ऑन ड्युटी 24 तास दक्ष राहून सर्वसामान्यांना सुरक्षित ठेवणाऱ्या पोलिसांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांकडे सरकार किती दुर्लक्ष करत आहे. हे पोलिस विभागाला मिळणाऱ्या बजेटवरून दिसून येते. आज कितीतरी पोलीस स्टेशनमध्ये बेसिक सुविधा नसूनही पोलीस त्यांचे काम चोखपणे करत आहे. पण या पोलिसांसाठी सरकार गृहविभागामार्फत फक्त 35,419 कोटी रुपयांची तरतूद करते. त्यातील प्रत्यक्ष पोलिसांच्या वाट्याला फक्त 26,524 कोटी रुपये येतात.
राज्याच्या अर्थसंकल्पातील 100 रुपयांमधून गृह विभागाला फक्त 5.40 रुपये मिळत आहेत. गृह विभागाच्या या वाट्यातील पोलिसांच्या पदरी फक्त 4.11 टक्के निधी पडत आहे. यावरून सरकार पोलिसांच्याबाबतीत किती उदासीन आहे, हे दिसून येते. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात गृह विभागाला 35,419 कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आली. या गृह विभागाच्या 35,419 कोटींमधून पोलिसांच्या वाट्याला फक्त अवघे 26,524 कोटी रुपये येत आहेत. 2015-16 ते 2021-22 या 7 वर्षांच्या कालावधीत होम डिपार्टमेंटला राज्याच्या एकूण अर्थसंकल्पातून सरासरी 5.42 टक्के एवढाच निधी उपलब्ध झाला आहे. फक्त 2016-17 या वर्षात पोलिसांना सर्वाधिक म्हणजे 6.20 टक्के निधी मिळाला होता.
गेल्या 7 वर्षात 13,472 कोटी रुपये खर्च
2015-16 ते 2021-2022 या 7 वर्षांच्या कालावधीत गृह विभागाने पोलीस खात्यावर सरासरी 13,472 कोटी रुपये खर्च केले आहेत. गृह विभागाला जो एकत्रित निधी दिला जातो. त्यामध्ये पोलिसांसह तुरूंग, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क, न्यायव्यवस्था, होमगार्ड, राज्य मानवी हक्क आयोग आदी संस्थाही येतात. त्या तुलनेत पोलीस यंत्रणेवर जितका खर्च होणे अपेक्षित आहे. तेवढा सरकारकडून केला जात नाही. मुंबई पोलिसांचे एकूण संख्याबळ 32,121 इतके आहे. त्यापैकी 24,996 पोलिसांपुरतीच निवासाची सोय उपलब्ध आहे.
स्त्रोत: समर्थन अर्थसंकल्प अध्ययन केंद्र
1 लाख लोकसंख्येमागे फक्त 169 पोलीस
राज्याची एकूण लोकसंख्या 12.49 कोटी इतकी आहे. तर त्या तुलनेत पोलिसांची संख्या 1,87,931 इतकी आहे. पोलिसांच्या या प्रत्यक्ष संख्येचा विचार करता राज्यातील प्रत्येक 1 लाख लोकसंख्येमागे फक्त 169 पोलीस उपलब्ध आहेत. यामध्ये महिला पोलिसांची संख्या तर अगदीच नगण्य असल्याचे दिसून येते. राज्याच्या आर्थिक पाहणीत उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, महिलांची एकूण संख्या 6.20 कोटी इतकी आहे आणि त्या तुलनेत महिला पोलिसांची संख्या फक्त 31,233 इतकीच आहे. ज्या पद्धतीने लोकसंख्या वाढत आहे. त्यातुलनेत पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यासाठी सरकारने प्राधान्याने बजेटची तरतूद केली पाहिजे. पण सरकारकडून तशी अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते.
कोरोनानंतर बांधकाम क्षेत्राने उभारी घेतली आहे. मात्र, महागाईने गृहप्रकल्प उभा करण्यासाठी विकासकांना येणाऱ्या खर्चातही वाढ झाली आहे. 40 लाख रुपयांच्या आतील म्हणजेच परवडणाऱ्या घरांची निर्मिती रोडावल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. बिल्डरकडून आलिशान गृहनिर्मिती प्रकल्पांना प्राधान्य देण्यात येत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न धूसर होत आहे
Karur Vysya Bank: करूर वैश्य बँकेने RBI ला फसवणूकीच्या खात्यांबद्दल (Fraud Bank Accounts) माहिती दिली नाही, त्यामुळे बँकेवर ही कारवाई करण्यात आली आहे. RBI च्या 2016 च्या निर्देशांनुसार सर्व बँकांसाठी अशा खात्यांची माहिती वेळोवेळी आरबीआयला देणे अनिवार्य आहे.
Government Schemes : सरकारकडून अशा अनेक योजना राबवल्या जात आहेत, ज्यांची बहुतांश लोकांना माहिती नाही. समानतेचा अधिकार देण्यासाठी आणि देशातील भेदभाव दूर करण्यासाठी सरकार अशीच योजना राबवत आहे, जी लोकांना सामाजिक सुरक्षा देण्याबरोबरच आर्थिक मदतही करते. 'आंतरजातीय विवाह योजना' योजना एक आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणारी योजना आहे, जी विवाहित लोकांना लाखो रुपयांपर्यंत रक्कम देते.