Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

IRCTC Travel Insurance: अवघ्या 1 रुपयांत इंडियन रेल्वे देते ट्रॅव्हल इन्शुरन्स, जाणून घ्या संपूर्ण माहिती!

IRCTC Travel Insurance

IRCTC Travel Insurance : ट्रॅव्हल इन्शुरन्स हे प्रवास करताना होणार्या जोखीम आणि आर्थिक नुकसानांपासून संरक्षण करण्यासाठी डिझाईन केलेले कव्हरेज आहे. प्रवासादरम्यान झालेली दुखापत किंवा अपघात यावर प्रवाशाला रेल्वेकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळते.

IRCTC Travel Insurance :  आजही आपण दूरचं अंतर कापायचं असेल आणि सुखात, आरामात प्रवास करायचा असेल तर रेल्वे प्रवासाला पसंती देतो. आता तुम्ही म्हणाल रेल्वेच का? एकतर रेल्वेचे प्रवास भाडे इतर पर्यायांपेक्षा खूपच कमी आहे. दुसरे म्हणजे रेल्वेने अगदी आरामात, झोपून, रमत-गमत मजेशीर प्रवास करता येतो. असा प्रवास इतर कोणत्याही पर्यायातून करता येत नाही. त्यात आता रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी तिकिटांसोबत ट्रॅव्हल इन्शुरन्स (Travel Insurance) देण्यास सुरूवात केली. या ट्रॅव्हल इन्शुरन्समुळे प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुरक्षित झाला आहे. पण हा ट्रॅव्हल इन्शुरन्स म्हणजे नेमका काय असतो? आणि रेल्वेचा ट्रॅव्हल इन्शुरन्स कसा मिळतो. याबद्दलची सर्व माहिती आपण जाणून घेणार आहोत.

अवघ्या 1 रुपयात इंडियन रेल्वे कंपनी प्रवास विमा देते. रेल्वेतून प्रवास करताना प्रवाशांना रेल्वे अवघ्या 1 रुपयांत इन्शुरन्स देते. पूर्वी इंडियन रेल्वे तिकिट खरेदीवर मोफत विमा देत होती. पण आता यासाठी रेल्वे 1 रूपया आकारत आहे.

ट्रॅव्हल इन्शुरन्स म्हणजे काय? (What is travel insurance?)

ट्रॅव्हल इन्शुरन्स हे प्रवास करताना होणार्या जोखीम आणि आर्थिक नुकसानांपासून संरक्षण करण्यासाठी डिझाईन केलेले कव्हरेज आहे. यातील जोखीमीमध्ये, किरकोळ गैरसोयींपासून जसे की चुकलेल्या बस ,रेल्वे , एअरलाईन कनेक्शन आणि विलंबाने मिळालेले सामान यासारख्या बेसिक समस्यांपासून, एखाद्या प्रवाशाला प्रवासादरम्यान झालेली दुखापत किंवा अपघात अशा जोखमींमधून होणाऱ्या प्रवाशांच्या आर्थिक नुकसानीची भरपाई मिळते.

शारीरिक / भौतिक नुकसानीच्या आधारे प्रवाशांना आर्थिक मदत!

प्रवासी विम्याचा पर्याय निवडणाऱ्या प्रवाशाचा प्रवासादरम्यान मृत्यू झाल्यास, रेल्वे त्याच्या कुटुंबाला 10 लाखांपर्यंतची आर्थिक मदत देते. यासोबतच अपघातात पूर्णपणे अपंगत्व आलेल्या प्रवाशांना आर्थिक मदत म्हणून 10 लाख रुपये रेल्वेकडून दिले जातात. तर एखाद्या अपघातामुळे अंशतः अपंगत्व आल्यास रेल्वेकडून प्रवाशांना 7,50,000 रुपये द्यावे लागतात. अपघातातील गंभीर जखमींना 2,00,000 रुपये आणि किरकोळ जखमी झालेल्या प्रवाशांच्या उपचारासाठी 10 हजार रुपये रेल्वेकडून दिले जातात. म्हणजेच जर तुम्ही ट्रेनमधून प्रवास करताना अपघाताला बळी पडलात तर तुम्हाला रेल्वेकडून आर्थिक भरपाई दिली जाते. 

विमा पर्याय (Insurance options)

रेल्वे वेबसाईट, अॅप किंवा इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक करताना, तुम्हाला प्रवास विम्याचा पर्याय दिसतो. यामध्ये तुम्हाला एक रुपयात प्रवासी विमा दिला जातो. या विम्याचा पर्याय निवडल्यास, प्रवासादरम्यान झालेला कोणताही अपघात आणि त्यामुळे तुमचे होणारे भौतिक नुकसान या बदल्यात रेल्वेकडून आर्थिक मदत दिली जाते. एसबीआय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड (SBI General Insurance Corporation Limited) आणि लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेड (Liberty General Insurance Limited) रेल्वेच्या वतीने हा प्रवास विमा दिला जातो. परंतु लक्षात ठेवा की तुम्ही विमा बॉक्सवर टीक केल्यास, त्याच PNR वर खरेदी केलेल्या प्रत्येक तिकिटाचा वैयक्तिक प्रवास विमा असतो. उदाहरणार्थ, जर तुम्ही तुमच्या कुटुंबातील चार सदस्यांसह प्रवास करत असाल आणि एकाच PNR वर सर्वांसाठी तिकीट बुक करत असाल, तर तुम्हाला प्रत्येक पॉलिसीसाठी1 रुपया देऊन प्रत्येकासाठी प्रवास विमा खरेदी करावा लागेल.

  • IRCTC प्लॅटफॉर्मवरून तिकीट बुक करणारा प्रत्येक भारतीय नागरिक हा प्रवास विमा खरेदी करू शकतो. 
  • एकदा तुम्ही विमा बॉक्सवर खूण केली आणि ऑनलाईन पेमेंट केले की, पॉलिसीची कागदपत्रे थेट विमा कंपनीकडून ईमेलद्वारे प्राप्त होतात. 
  • तुमच्याकडे विमा खरेदी न करण्याचा पर्याय देखील आहे. पण भारतात प्रवासी विमा 10 लाख पर्यंतच्या कव्हरसह फक्त १ रुपया मध्ये निश्चितच एक चांगली ऑफर आहे; जो कोणीही चुकवू नये. त्यामुळे, प्रत्येक वेळी तुम्ही IRCTC वर तिकीट बुक करता तेव्हा या प्रवास विम्याची निवड करण्याचा विचार करा आणि तुमच्या प्रत्येक ट्रेन प्रवासासाठी उच्च स्तरावरील संरक्षणाचा अनुभव घ्या. 


ही विमा कंपनी देते पैसे!

जर तुम्ही तिकीट बुक करताना विम्याचा पर्याय निवडला असेल तर तुम्हाला झालेल्या कोणत्याही अपघात आणि शारीरिक नुकसानाच्या बदल्यात रेल्वेकडून आर्थिक मदत मिळू शकते. एसबीआय जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन लिमिटेड आणि लिबर्टी जनरल इन्शुरन्स लिमिटेड भारतीय रेल्वेच्या वतीने हा प्रवासी विमा दिला जातो.

प्रवासी विमा योजनेबद्दल इतर महत्त्वाच्या गोष्टी!

  • प्रवास विमा योजना सर्व वर्गांसाठी एकसमान ठेवण्यात आली आहे.
  • विमा पॉलिसीची निवड केल्यावर, ग्राहकाला पॉलिसीची माहिती एसएमएसद्वारे आणि नोंदणीकृत ईमेल आयडीवर, विमा कंपन्यांकडून थेट तपशील भरण्यासाठी लिंक प्राप्त होते. आयआरसीटीसीच्या साईटवरून तिकिट बुक केलेल्या हिस्ट्रीवरून पॉलिसी क्रमांक पाहता येतो.
  • तिकीट बुक केल्यानंतर, नामांकन तपशील संबंधित विमा कंपनीच्या वेबसाइटवर भरले जाणे आवश्यक आहे. जर नामनिर्देशन तपशील भरले नाहीत, तर IRCTC नुसार, दावा उद्भवल्यास कायदेशीर वारसांसह समझोता केला जातो.
  • कोणत्याही कारणास्तव गाड्यांचा कालावधी कमी झाल्यास, प्रवाशाने गंतव्य स्थानकापर्यंत रेल्वेने व्यवस्था केलेल्या वाहतुकीच्या पर्यायी पद्धतीचा पर्याय निवडल्यास, प्रवाशाच्या प्रवासाचा हा भागही प्रवाशाने घेतलेल्या धोरणांतर्गत समाविष्ट केला जातो. .
  • कोणत्याही कारणामुळे ट्रेन इतर मार्गावर वळवल्यास, त्या वळवलेल्या मार्गासाठी कव्हरेज लागू होते.
  • प्रवाशांनी एकदा प्रीमियम भरला की रद्द करण्याची परवानगी नाही. त्यानुसार, प्रतीक्षा-सूचीबद्ध तिकिटासह सर्व प्रकरणांमध्ये कोणताही परतावा दिला जात नाही.
  • पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी प्रवासी विमा दिला जात नाही.


1 रुपयांत कोणतीही इन्शुरन्स कंपनी इतके फायदे देत नाही. प्रवासादरम्यान तुम्हाला या सोयीसुविधा हव्या असतील तर तुम्हाला प्रवाशी विमा पर्याय निवडावा लागेल.