Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Unemployment Allowance: जाणून घ्या, महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचे उद्दिष्ट आणि बरेच काही..

Unemployment Allowance

Unemployment Allowance: महाराष्ट्र सरकारने बेरोजगारी भत्ता योजना सुरू केली असून, त्याअंतर्गत पात्र उमेदवारांना दरमहा 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही योजना 2020 मध्ये जाहीर करण्यात आली होती. 12वी व पदवीधर बेरोजगार युवक या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Unemployment Allowance: महाराष्ट्र सरकारने बेरोजगारी भत्ता योजना सुरू केली असून, त्याअंतर्गत पात्र उमेदवारांना दरमहा 5000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. ही योजना 2020 मध्ये जाहीर करण्यात आली होती. 12वी व पदवीधर बेरोजगार युवक या योजनेचा लाभ घेऊ शकतात. बेरोजगारीची सध्याची स्थिती पाहता, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना चांगले जीवन जगता यावे यासाठी त्यांना बेरोजगारी भत्ता मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. राज्यातील बेरोजगारी दर कमी करणे आणि जीवनशैली सुधारणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेसाठी अर्ज करायचा असल्यास अधिकृत वेबसाइटला भेट देवू शकता. 

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचे उद्दिष्ट (Objective)

राज्यातील सर्व बेरोजगार तरुणांना बेरोजगारी भत्ता देण्याचा मुख्य उद्देश त्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. जेणेकरून तो कोणावरही ओझे होऊ नये आणि स्वत:साठी चांगली नोकरी शोधू शकेल. या योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दरमहा पाच हजार रुपये दिले जाणार आहेत.

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेची पात्रता (Eligibility)

  • उमेदवार बेरोजगार असावा.
  • अर्जदाराचे कौटुंबिक उत्पन्न 03 लाखांपेक्षा जास्त नसावे.
  • अर्जदाराच्या उत्पन्नाचा अन्य कोणताही स्रोत नसतानाच उमेदवार पात्र ठरतो.
  • लाभ घेण्यासाठी 12वी पास ही किमान पात्रता आवश्यक आहे.
  • उमेदवाराची नोंदणी  महाराष्ट्र रहिवासी 5 वर्षे ते 10 वर्षे असावी.
  • अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा आणि त्याच्याकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसावा. 
  • अर्जदाराचे वय 21 ते 35 वर्षे दरम्यान असावे आणि तो किमान 12वी पास असावा तरच तो या योजनेसाठी अर्ज करू शकतो. 

महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचे लाभ (benefits)

  • अर्जदाराला नोकरी मिळेपर्यंत राज्य सरकारकडून बेरोजगारी भत्ता दिला जाईल.
  • बेरोजगारी परिस्थितीसह जीवनमान सुधारण्यासाठी टीम मदत करेल.
  • यामुळे सुशिक्षित लोकांना त्यांचे करियर बनवण्यासाठी आणि व्यावसायिकरित्या सेटल होण्यासाठी थोडा वेळ मिळेल.