Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Chana Market: नवीन चणा मार्केटमध्ये आल्याने चणा डाळीच्या दरात बदल होणार का?

Chana Market

Chana Market: देशातील हरभरा डाळीच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेडकडून (Nafed) खुल्या बाजारात कमी दराने हरभरा विकला जात आहे. त्यामुळे देशात हरभरा आणि हरभरा डाळीचे भाव नियंत्रणात आहेत.

Chana Market: देशातील महागाई (Inflation in the country) नियंत्रित करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. आगामी काळात डाळींचे भाव वाढू नयेत, यासाठी सरकारने आतापासूनच व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे. देशातील हरभरा डाळीच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी नाफेडकडून खुल्या बाजारात कमी दराने हरभरा विकला जात आहे. त्यामुळे देशात हरभरा आणि हरभरा डाळीचे भाव नियंत्रणात आहेत.

चणा डाळीचे दर….. (Chana dal price….)

गेल्या हंगामात देशात हरभऱ्याचे चांगले उत्पादन झाले होते. गेल्या हंगामात नाफेडने एमएसपी शेतकऱ्यांकडून भरपूर हरभरा खरेदी केला होता. आता नाफेड निविदा प्रक्रियेद्वारे खुल्या बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदीदारांना 4700 रुपये प्रति क्विंटल दराने हरभरा विकत आहे. नाफेडने हरभरा विक्री केल्यामुळे बाजारात हरभऱ्याचे भाव 4800 ते 4900 रुपये प्रतिक्विंटल आहेत. सद्यस्थितीमध्ये चणा डाळीचे दर 130 रुपये प्रतिकिलो आहे. 

2022-23 हंगामासाठी हरभऱ्याचा एमएसपी 5,335 रुपये प्रति क्विंटल होता. नाफेडने हरभरा विक्री केल्याने बाजारात हरभरा व हरभरा डाळीचे भाव स्थिर झाले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबर 2022  मध्येही भारताने 2 लाख टन अरहर डाळींची आयात केली होती. भारत बहुतेक अरहर डाळ पूर्व आफ्रिकन देश (East African countries) आणि म्यानमारमधून (Myanmar) आयात करतो. 2021-22 या आर्थिक वर्षात भारताने एकूण 7.6 लाख टन अरहर डाळींची आयात केली. 

गव्हाच्या उत्पादनात वाढ (Increase in wheat production)

या हंगामात देशात गव्हाचे उत्पादन गेल्या वर्षीपेक्षा जास्त असू शकते. पीक वर्ष 2022-23 मध्ये, कृषी मंत्रालयाने भारतात 112 दशलक्ष टनांहून अधिक गव्हाचे उत्पादन होण्याचा अंदाज वर्तवला आहे. 2021-22 मध्ये देशात गव्हाचे उत्पादन 106 दशलक्ष टन होते. 2020-21 मध्ये भारतात 109 दशलक्ष टन होते. गेल्या वर्षी देशात गव्हाचे कमी उत्पादन आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) वाढलेली मागणी यामुळे भारतातील गव्हाचे भावही वाढले आहेत. गव्हाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती.