Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ayushman Card : आयुष्मान कार्ड असूनही मोफत उपचार मिळत नाही? तर येथे नोंदवा तक्रार

Ayushman Card

Image Source : www.timesnowmarathi.com

गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळावी यासाठी भारत सरकार आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) राबवते. पण या योजनेंतर्गत जर कोणाला उपचार मिळत नसतील तर संबंधिताने त्याबाबतची चर्चा कुठे करावी? याविषयी जाणून घेऊया.

गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागास लोकांना भविष्यासाठी तरतूद करणे कठीण असते. विम्याचे महागडे प्रीमियम भरण्यास हे लोक असमर्थ असतात. त्यामुळे ते त्याचा लाभ घेऊ शकत नाहीत. अशा लोकांना मोफत उपचार मिळावेत यासाठी भारत सरकार आयुष्मान भारत योजना (Ayushman Bharat Yojana) राबवते. जे या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत त्यांच्यासाठी सरकारकडून आयुष्मान कार्ड (Ayushman Card) जारी केले जाते. या कार्डद्वारे सूचीबद्ध रुग्णालयांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार केले जाऊ शकतात. पण जर आयुष्मान कार्ड असूनही हॉस्पिटल तुम्हाला मोफत उपचार देण्यास नकार देत असेल, तर तुम्ही या प्रकरणी तक्रार दाखल करू शकता.

टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवा

आयुष्मान भारत योजनेचा राष्ट्रीय स्तरावरील टोल फ्री क्रमांक 14555 हा आहे. ज्यावर देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात राहणारा नागरिक या प्रकरणाची तक्रार करू शकतो. याशिवाय राज्यांनुसार वेगवेगळे टोल फ्री क्रमांक जारी करण्यात आले आहेत. याशिवाय आयुष्मान भारत योजनेत सहभागी असलेल्या सर्व रुग्णालय चालकांना त्यांच्या रुग्णालयातील बोर्डवर आयुष्मान योजनेचा टोल फ्री क्रमांक नोंदविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

असे होते तक्रारीचे निवारण

तुम्ही तुमच्या राज्याच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता तेव्हा तो कॉल थेट त्या राज्याच्या राजधानीच्या केंद्रापर्यंत पोहोचतो. यानंतर संबंधित अधिकाऱ्याला तक्रारीचे निवारण करण्याच्या सूचना दिल्या जातात. याशिवाय जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाते, जी तक्रारींची चौकशी करून कारवाई करते.

येथेही तक्रार करू शकता

टोल फ्री क्रमांकावर तक्रार करूनही तुमची सुनावणी होत नाही असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तक्रार पोर्टलवर तुमची तक्रार नोंदवू शकता. यासाठी तुम्हाला https://cgrms.pmjay.gov.in/GRMS/loginnew.htm या लिंकवर क्लिक करून तक्रार नोंदवावी लागेल. यासाठी तुम्हाला REGISTER YOUR GRIEVANCE या पर्यायावर क्लिक करून या प्रकरणाची तक्रार करावी लागेल.

3.07 कोटी लाभार्थ्यांना आयुष्मान भारत गोल्डन कार्डचे वितरण

भारतातील सर्वात मोठी आरोग्य योजना आयुष्मान भारत योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत आयुष्मान भारत योजनेंतर्गत योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या 20 लाखांच्या पुढे गेली असून याअंतर्गत 3.07 कोटी लाभार्थ्यांना आयुष्मान भारत गोल्डन कार्ड मिळाले आहे. भारतात दर 1 मिनिटाला एक व्यक्ती अशी आहे जिच्यावर आयुष्मान भारत योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जात आहेत. ही योजना राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या (NHA) देखरेखीखाली चालविली जाते.