Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Tomato Price : टोमॅटोचे भाव गडगडल्याने शेतकरी हवालदिल! नुकसान टाळण्यासाठी केंद्र सरकार सज्ज

Tomato

जुलै महिन्यात मान्सूनने देशभरात चांगलाच जोर धरला होता. पावसाने अनेक राज्यांना झोडपून काढले होते. अशातच टोमॅटोची सर्वात जास्त पुरवठा करणारे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये भूस्खलन, अतिवृष्टी अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये टोमॅटोची आवक मंदावली होती.

मागच्या दोन महिन्यांपासून सामन्यांच्या किचनचे बजेट बिघडवणारा टोमॅटो आता कवडीमोल भावाने बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. रबीचे पिक संपायला आले असताना आणि पावसाचा जोर वाढल्यामुळे दळणवळण समस्या निर्माण झाल्यामुळे देशातील अनेक भागांमध्ये टोमॅटोचे भाव 200 च्याही वर पोहोचले होते. दिल्ली, एनसीआर आणि इतर काही राज्यांत टोमॅटो 250-270 रूपे किलो दराने विकले जात होते. आता मात्र हेच टोमॅटो 5-10 रूपये किलोने विकले जात आहेत.

शेतकरी हवालदिल 

जुलै महिन्यात मान्सूनने देशभरात चांगलाच जोर धरला होता. पावसाने अनेक राज्यांना झोडपून काढले होते. अशातच टोमॅटोची सर्वात जास्त पुरवठा करणारे हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आदी राज्यांमध्ये भूस्खलन, अतिवृष्टी अशा समस्या निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र, राजस्थान आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये टोमॅटोची आवक मंदावली होती.

मात्र ऑगस्टमध्ये पावसाळा कोरडाच गेला आणि खरीपाचे पिक बाजारात यायला सुरुवात झाली. पिकाची आवक मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे टोमॅटोचे भाव देखील गडगडायला सुरुवात झाली. 200 रूपये पार गेलेले टोमॅटो आता 3 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये किलोने शेतकऱ्यांना विकावे लागत आहेत. काही शेतकऱ्यांनी तर आता टोमॅटो गायगुरांना खाऊ घालायला सुरुवात केल्याचे देखील समोर आले आहे. सर्वाधिक फटका हा आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बसला आहे.

सरकार घेणार निर्णय 

शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी लक्षात घेता सरकारी यंत्रणा देखील सज्ज झाल्याचे पाहायला मिळते आहे. स्थानिक बाजारपेठेत टोमॅटोची आवक वाढल्याने ज्या भागात टोमॅटोचे भाव पडले आहेत, तेथून सरकार थेट टोमॅटो खरेदी करू शकते.

केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या ग्राहक व्यवहार विभागाने याबाबत चाचपणी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे. सदर मंत्रालयाकडे किंमत स्थिरीकरण निधी (Price Stabilization Fund) असतो, जो निधी शेतीमालाच्या किमती स्थिर करण्यासाठी सरकार वापरू शकते. सदर निधीच्या माध्यमातून केंद्र सरकार शेतकऱ्यांकडून टोमॅटो खरेदी करू शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.