Rice export increases to China from India: चीन भारताकडून मोठ्या प्रमाणात तांदूळ खरेदी करत असल्याचे गेल्या काही महिन्यांमध्ये दिसून आले आहे. चालू आर्थिक वर्ष 2022-23 च्या पहिल्या 9 महिन्यांत भारताची चीनला तांदूळ निर्यात 53 टक्क्यांनी निर्यात वाढली आहे. तब्बल 13.94 लाख टन तांदूळ आत्तापर्यंत चीनला पाठवण्यात आला आहे. तांदूळ खरेदीदार म्हणून चीन पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. बिगर बासमतीच्या एकूण निर्यातीपैकी 11 टक्के हिस्सा आता चीनला गेला आहे.
चीन भारतातून तांदूळ खरेदी का करतोय? (Why is China buying rice from India?)
पॅराडाइम कमोडिटीचे संस्थापक आणि कमोडिटी तज्ज्ञ बिरेन वकील यांनी सांगितले की, गेल्या वर्षी चीनमध्ये मोठा दुष्काळ पडला होता, जो गेल्या 60 वर्षांतील सर्वात भीषण दुष्कळ मानला गेला. याशिवाय, गेल्या 2 वर्षात, जगभरातील तांदूळ आणि अन्नपदार्थांच्या प्रचंड तुटवड्यामुळे, जागतिक तेलबिया इत्यादींच्या अन्न बाजारपेठेत प्रचंड मागणी आहे. यातच 2 वर्षांच्या लॉकडाऊननंतर चीन नुकताच पूर्णपणे खुला झाला आहे. येथून मोठ्या प्रमाणात मागणी निर्माण झाली. फक्त तांदूळच नाही तर इतर वस्तूही जगातील देशांतून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात आल्या. पॅराडाइम अॅडव्हायझरी ही सानुकूलित आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून वस्तू आणि पर्यायी मालमत्तेच्या किंमत आणि जोखीम व्यवस्थापन सल्ला देते.
चीनमध्ये केमिकलच्या अतिवापरामुळे शेतजमीन खराब होत चालली आहे, यामुळे उत्पन्न घटले आहे. खरेतर, भारत आणि चीन हे जगातील सर्वात मोठे भातशेती उत्पादक देश आहेत. मात्र सध्या चीन मोठा तांदुळ आयातदार देश म्हणून पुढे येत आहे. चीन आणि भारतात सर्वप्रथम तांदुळ उगवले गेल्याचे पुरावे सापडले आहेत. अतिप्राचीन काळापासून भात चीन, भारत, श्रीलंका येथे उगवत आहे. मात्र केमिकलमुळे आणि मागील वर्षी पडलेल्या दुष्काळामुळे यात आणखी भर पडली. लॉकडाऊनमुळे चीनमधील शेतकऱ्यांना खते, बियाणे मिळण्यास अनेक अडचणी यामुळे भात शेतीचे प्रमाण अधिकच घटले. चीनमध्ये भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. तसेच तेथे भात मोठ्या प्रमाणात खाल्लाही जातो. त्यामुळे भाताची गरज पूर्ण करण्यासाठी चीनला सध्या भारतावर अवलंबून राहावे लागत आहे.
संपूर्ण जगाला भारताचे तांदूळ आवडतात का? (whole world love India's rice?)
भारत हा जगातील सर्वात मोठा तांदूळ निर्यात करणारा देश आहे. तांदळाच्या जागतिक व्यवसायात भारताचा 40 टक्के हिस्सा आहे. गेल्या आर्थिक वर्षात बासमती तांदळाची निर्यात 39.4 लाख टनांवर आली होती. मात्र, चालू आर्थिक वर्षात ऑगस्टपर्यंत बासमती तांदळाची निर्यात वाढून 18.2 लाख टन झाली आहे. 2021 मध्ये, भारताचा तांदूळ निर्यात रेकॉर्ड 21.5 दशलक्ष टनांवर पोहोचला, जो जगातील चार सर्वात मोठ्या निर्यातदार थायलंड, व्हिएतनाम, पाकिस्तान आणि अमेरिका यांच्या एकूण निर्यातीपेक्षा जास्त आहे. भारताला त्याच्या किमतीचा सर्वात मोठा फायदा होतो कारण तो सर्वात स्वस्त पुरवठादार आहे. भारताला 2021 मध्ये तांदुळाची निर्यात करून, तब्बल 37 हजार 847 .53 कोटी रुपये मिळाले होते.