शेतकऱ्यांना लवकरच मिळणार राज्यसरकारच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा' लाभ

आता राज्य सरकारसुद्धा केंद्र सरकारप्रमाणे 6 हजार रुपये वर्ष शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे

राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या दोन्हीमधून प्रती वर्ष 12 हजार रुपये मिळतील

पीएम किसान सन्मान निधी योजनेचे जे लाभार्थी आहे, त्यांनाच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेता येईल

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजने’चा लाभ 1 कोटी 15 लाख शेतकरी कुटुंबाना होणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे

‘नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा केला जाईल ते बँक खातं आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे बंधनकारक आहे